सांगली: सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांना चारही साधूंना मारहाण केली.
मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतुन चारही साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली आहे. उमदी पोलिसांकडून तातडीनं कारवाई करुन नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवलं गेलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलागत असणाऱ्या जत तालुक्यातील लवंगा येथे 4 साधूंना गाडीतून ओढून पट्ट्यानं, काठीनं मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून 4 साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थीनीस केली असता मुलं चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण केली.
सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वच स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी साधूंनी आपलं ओळखपत्र, आधार कार्ड याबाबतची सविस्तर माहिती जमावाला देऊनही जमावानं न ऐकल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…