क्राईम

कांद्याच्या आरणीवरून वाद विकोपाला; एका शेतकऱ्यावर सात जणांचा हल्ला

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेजारील सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 259/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाबुराव सगाजी इचके (वय 46), व्यवसाय – शेती, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या गट नं. 291 या मालकीच्या जमिनीत पत्नी अनिता, मुलगी धनश्री, चुलत भाऊ सोमनाथ इचके आणि काही नातेवाईकांसह कांद्याच्या आरणीचे (चाळीचे) बांधकाम करत असताना ही घटना घडली.यावेळी त्यांचे शेजारी आशा बबन इचके,राजेंद्र बाळकृष्ण इचके,सुरेखा राजेंद्र इचके,यश राजेंद्र इचके, मंगल बाळकृष्ण इचके, रूपाली संतोष इचके ,संतोष बाळकृष्ण इचके (सर्व रा. इचकेवाडी, कवठे येमाई) – यांनी जमाव जमवून “ही जमीन आमची आहे, येथे आरण बांधू नका” असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पो.ह.वा. बनकर हे करीत आहेत.या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत कलम 115 (2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नाहीत, मात्र पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

शेतीच्या मालकीवरून वाद हा काही नवा विषय नाही, पण यामुळे हिंसाचाराला सामोरे जावे लागणे ही चिंतेची बाब आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago