शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर येथील शांतीनगर परिसरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. यामध्ये दोन महिलांवर तसेच एका अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दीक्षा मोहन राखपसरे (वय 30, व्यवसाय – मजुरी, रा. शांतीनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास, शांतीनगर येथे प्रकाश विठठ्ठल लोंढे यांच्या घरासमोर वादाची ठिणगी पडली. या वादात दीक्षा राखपसरे, त्यांची सासू लिलाबाई लक्ष्मण राखपसरे व मुलगा श्रेयश यांना गंगा विठठ्ल लोंढे, प्रकाश विठठ्ल लोंढे व कैलास विठठ्ल लोंढे यांनी मारहाण केली. विशेषतः प्रकाश लोंढे याने श्रेयश या अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक खेडकर हे करत आहे.शांतीनगर परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…