शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर येथील शांतीनगर परिसरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. यामध्ये दोन महिलांवर तसेच एका अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दीक्षा मोहन राखपसरे (वय 30, व्यवसाय – मजुरी, रा. शांतीनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास, शांतीनगर येथे प्रकाश विठठ्ठल लोंढे यांच्या घरासमोर वादाची ठिणगी पडली. या वादात दीक्षा राखपसरे, त्यांची सासू लिलाबाई लक्ष्मण राखपसरे व मुलगा श्रेयश यांना गंगा विठठ्ल लोंढे, प्रकाश विठठ्ल लोंढे व कैलास विठठ्ल लोंढे यांनी मारहाण केली. विशेषतः प्रकाश लोंढे याने श्रेयश या अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक खेडकर हे करत आहे.शांतीनगर परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…