मनोरंजन

‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरू-शिष्य आमनेसामने; भैरवीचा डाव सावलीवर भारी पडणार का?

मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये गुरू-शिष्याचं नातं आता थेट संघर्षाच्या वळणावर आलं आहे. मालिकेत भैरवी आणि सावली एकाच मंचावर आमनेसामने येणार असून, त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर तिला तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं. वझे घराण्याची गायन परंपरा जपण्यासाठी भैरवीने स्वतःच्या मुलीला गाणं येत नसतानाही सावलीकडून वर्षानुवर्षे गाऊन घेतलं आणि मात्र ताराला गायिका म्हणून जगासमोर सादर केलं. सारंगला हे सत्य समजताच त्याने सर्वांसमोर भैरवीचा पर्दाफाश केला.

या घटनेनंतर भैरवी एकटी पडली. तिने आपल्या शृंगाराचा त्याग करत सावली, सारंग, ऐश्वर्या आणि इतरांचा बदला घेण्याचा निर्धार केला. सावली आणि सारंग एकत्र येत भैरवीचे कारस्थान उधळून लावत असतानाच, आता भैरवीने सावलीला थेट जुगलबंदीचं आव्हान दिलं आहे.

जुगलबंदीत विषाचा डाव!

मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यात भैरवी आणि सावली एकाच मंचावर दिसत आहेत. भैरवी गाणं सादर करत असताना सावली पाणी पिते. मात्र, सावली गाऊ नये यासाठी भैरवीने मोठं षडयंत्र रचलेलं असतं. सावलीच्या वहिनीच्या मदतीने तिच्या पाण्यात औषध मिसळण्यात आलेलं दाखवण्यात आलं आहे.

भैरवीचं गाणं संपल्यानंतर ती सावलीला गाण्यास सांगते. मात्र सावलीच्या गळ्यातून सूर फुटत नाहीत. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. सावली गात नाही हे पाहून सारंग, त्याचे आई-वडील, जगन्नाथ आणि त्यांची पत्नी चिंतेत सापडतात. यावेळी भैरवी टोमण्यानं विचारते, “काय झालं सावली? गळ्यातून सूर फुटत नाहीत का?”हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने कॅप्शन दिलं आहे,“भैरवीच्या षडयंत्रामुळे होणार का सावलीचा पराभव?”

पुढे काय?

सावली का रडतेय? तिला पुन्हा गाणं गाता येईल का? भैरवीचा डाव उघडकीस येणार का? सावली भैरवीला प्रत्युत्तर देणार का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून, ‘सावळ्याची जणू सावली’ मधील पुढील भागांकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

8 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

17 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

17 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

18 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

23 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

23 तास ago