मनोरंजन

लग्नानंतर होईलच प्रेम! लालबागच्या राजाच्या साक्षीने जीवा-नंदिनी, पार्थ-काव्याची दणक्यात वरात!

मुंबई: स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या या दोन्ही जोडप्यांनी प्रेम जुळल्यानंतर पुन्हा एकदा स्वखुशीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.या खास प्रसंगानिमित्त दोन्ही जोडप्यांची वरात थेट मुंबईच्या रस्त्यांवरून दणक्यात निघाली. लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेत या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात रंगली वरात

जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नाची वरात वाजतगाजत, ढोल-ताशांच्या तालावर आणि पारंपरिक लग्नगीतांच्या सुरावटीत लालबागच्या रस्त्यांवरून निघाली. व्हिंटेज कार, पारंपरिक वेशभूषेतील वऱ्हाडी मंडळी आणि जल्लोषात नाचणारे चाहते यामुळे हा सोहळा अधिकच लक्षवेधी ठरला.मुंबईकरांनीही या अनोख्या लग्नसोहळ्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, मराठी मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चाहत्यांनी प्रत्यक्ष लग्न सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत कलाकारांसोबत हा क्षण साजरा केला.

कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

जीवाची भूमिका साकारणारा विवेक सांगळे म्हणाला,“मी मुळचा मुंबईतील लालबागचा आहे. मालिकेतील इतका महत्त्वाचा टप्पा लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने पार पडतोय, याहून मोठं भाग्य काय असू शकतं? हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.”

नंदिनीची भूमिका साकारणारी मृणाल दुसानिस म्हणाली, “प्रेक्षकांसोबत अशा पद्धतीने लग्न साजरं करणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नव्या प्रवासाची सुरुवात करताना प्रचंड आनंद होत आहे.”

पार्थची भूमिका साकारणारा विजय आंदळकर म्हणाला,“ढोल-ताशे, वऱ्हाडी, चाहते आणि बाप्पांचा आशीर्वाद… सगळंच स्वप्नवत वाटतंय. प्रेक्षकांनी आम्हाला कुटुंबासारखं प्रेम दिलंय, यापुढेही तसंच प्रेम मिळेल याची खात्री आहे.”

काव्याची भूमिका साकारणारी ज्ञानदा म्हणाली,“हा लग्नसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांसोबत साजरा करता आला, याचा खूप आनंद आहे. चाहत्यांकडून इतकं प्रेम मिळेल असं वाटलं नव्हतं. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे.”एकूणच, मालिकेतील हा लग्नसोहळा केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्षातही रंगला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

8 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

9 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

13 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

13 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

13 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

13 तास ago