मुंबई: अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरकेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली होती. आता केआरकेला जामिनावर सोडण्यात आले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये केआरकेने लिहिले की, मी माझ्या घरी सुखरुप परतलोय. तसे कमाल आर खान आणि वाद हे समीकरण मुळात नवे नाही.
मी सुखरुप माझ्या घरी परतलो आहे…
केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मीडिया नवीन स्टोरी तयार करत आहे. मी सुखरुप माझ्या घरी परत आलो आहे. मला कोणाकडून बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते सर्व मी विसरलो आहे. ते माझ्या नशिबातच लिहिलेले असेल असे मला वाटत आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटसाठी मुंबई पोलिसांनी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरलो…
जामीन मिळाल्यानंतर केआरके नेमके काय ट्विट करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला जामीन मिळाल्यावर केआरकेने एक ट्विट केले होते, त्यामध्ये लिहिले होते की, मी बदला घेण्यासाठी परत आलो आहे. मात्र, त्यानंतर केआरकेने जे दुसरे ट्विट केले त्यानंतर सर्वांना मोठा आर्श्चयाचा धक्काच बसलाय कारण दुसऱ्या ट्विटमध्ये केआरकेने जे घडले ते मी विसरलो असल्याचे म्हटले आहे.
शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…
पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक…
शिक्रापूर: शिक्रापूरचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये…
शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने…
शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत…
शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…