मनोरंजन

अजित दादांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक; ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर अश्रूंनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळासह मराठी मनोरंजन विश्वातूनही तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अनेक कलाकारांनी भावुक शब्दांत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीला उपस्थित होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी मंचावर उभं राहून त्याने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रितेश भावुक झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

“२८ जानेवारीचा सूर्य ‘सकाळ’ घेऊन येण्याऐवजी ‘काळरात्र’ घेऊन आला,” असे शब्द वापरत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. “अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ होते. त्यांच्या शब्दात ताकद होती, नजरेत धाक होता आणि मनात माणुसकी होती. त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे,” असं तो म्हणाला.

अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना रितेश म्हणाला, “शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अजित दादा. अनेक वर्षे रखडलेली कामं त्यांच्या एका आदेशावर मार्गी लागत. म्हणूनच ते सामान्य माणसाच्या आयुष्यातील ‘कामाचा माणूस’ होते.” शेवटी, “दादा तुम्ही कालही प्रेरणा होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल,” असे म्हणत त्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.

दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ३१ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

13 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago