महाराष्ट्र

दुःख नाकारलं नाही, जबाबदारी स्वीकारली! सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर अंकिता वालावलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज (३१ जानेवारी) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

शपथविधीनंतर अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर आपलं स्पष्ट आणि संवेदनशील मत मांडलं आहे. अंकिता वालावलकर लिहिते, “सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात, तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत.”

तिने पुढे सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर भाष्य करत म्हटलं आहे की, “ट्रोल करणं खूप सोपं असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवतेय, तिच्या मनात काय चाललंय, हे आपण जाणत नाही. संवेदनशीलता आणि समजूतदारपणा आज फार गरजेचा आहे. राजकारणात टीका होणारच, पण व्यक्तिगत दुःखावर उपहास करणं समाजाचं प्रतिबिंब दाखवतं.”

दरम्यान, राज्याच्या ११व्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती सोपवण्यात आली आहेत. मात्र, अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ व नियोजन खातं सध्या त्यांना देण्यात आलेलं नाही. हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून ये

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

2 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

2 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

2 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

2 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

4 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

5 तास ago