मुंबई: छोट्या पडद्यावर सध्या मालिकांची स्पर्धा चांगलीच रंगली आहे. Zee Marathi आणि Star Pravah यांच्यात टीआरपीसाठी चुरस निर्माण झाली आहे. झी मराठीच्या मालिकांना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहने आता नवा डाव टाकत ‘आनंदी’ ही नवीन मालिका जाहीर केली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रोमोमधील वेगळेपणा काय?
‘आनंदी’च्या प्रोमोमध्ये तीन बहिणी पार्लरमध्ये दाखवल्या आहेत. मोठी बहीण खुर्चीत बसलेली असते, तर तिच्या दोन लहान बहिणी पार्लरवाल्याला तिच्या भुवया कोरायला सांगतात. काम पूर्ण झाल्यानंतर तिला आरसा दाखवण्यात येतो. मात्र दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. त्यावर मोठी बहीण आत्मविश्वासाने “मी छान दिसतेय” असे म्हणते.
“तुला खरंच दिसतंय का?” असा प्रश्न विचारल्यानंतर प्रेक्षकांना समजते की ती अंध आहे. पुढील दृश्यात पैसे देताना ती अचूक नोट ओळखते आणि सुट्टे पैसे घेताना झालेली चूकही दाखवते. वाटेत चाफ्याच्या सुगंधाने थांबण्याचा प्रसंग तिच्या संवेदनशीलतेची जाणीव करून देतो. या दृश्यांमधून तिची आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठळकपणे मांडण्यात आला आहे.
वेगळ्या कथानकाची उत्सुकता
मराठी मालिकांमध्ये अनेक विषय हाताळले गेले असले तरी अंध नायिकेच्या आयुष्याभोवती फिरणारी कथा क्वचितच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ‘आनंदी’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रसारणाबाबत उत्सुकता
‘आनंदी’ ही मालिका १६ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तिची नेमकी वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते ही मालिका संध्याकाळच्या स्लॉटमध्ये दाखवावी, अशी मागणी करत आहेत. काही प्रेक्षकांनी जुन्या मालिकांना निरोप देऊन नव्या मालिकांना संधी द्यावी, असे मतही व्यक्त केले आहे.टीआरपीच्या शर्यतीत आघाडी मिळवण्यासाठी स्टार प्रवाहचा हा नवा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल, आणि ‘आनंदी’ प्रेक्षकांच्या मनात किती घर करेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…