कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरात गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ नावाच्या तब्बल २०३ किलो ६०० ग्रॅम गोळ्या बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका तरुणास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली व तंबाखुजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर भुमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
दि. १० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना, विपुल विटकर (रा. रांजणगाव गणपती) हा त्याच्या राहत्या घरात तसेच घराशेजारील पानटपरीत ‘बंटा’ नावाच्या गुंगीकारक, गांजा मिश्रित गोळ्या विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिस हवालदार तुषार पंदारे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करुन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करत शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने छापा टाकत हि मोठी कारवाई केली.
या छाप्यात आरोपीकडुन २०३ किलो ६०० ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित ‘बंटा’ गोळ्या ५७,३५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी विपुल संदीप विटकर (वय २० वर्षे) याच्याविरुद्ध सरकारतर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असुन एनडीपीएस अॅक्ट, बीएनएस तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संगपाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, सागर धुमाळ, राजु मोमीण, राहुल पवार, रांजणगाव पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास अविनाश थोरात हे करत आहेत.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…