मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भितीचे वातावरण

शिरुर (अरुणकुमार मोटे) बेट भागासह शिरूर तालुक्यात डिंभा व चासकमान धरणांचे पाणी नदी व कालव्यांद्वारे शेतीसाठी मोठया प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बारमाही पिके घेत आहे. जंगलांची मोठया प्रमाणावर कत्तल केल्यामुळे व तेथे पाणी व पुरेसे खादय उपलब्ध होत नसल्याने जंगल सोडून बिबट्यांनी ऊसशेती व इतर पिकांमध्ये राहणे पसंद केले असुन परीणामी बिबट शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरच आता नागरीकांना आता भक्ष म्हणुण लक्ष करू लागला आहे. जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात दोन वर्षापुर्वी एका बालकाचा व दोन महीन्यांपुर्वी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड , वडनेर येथील बिबटयाने नागरीवंर हल्ले चढवून गंभीर जखमी केले आहे.

शिरूर तालुक्यात बिबटयांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना बिबटयाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी व नागरीक भयभीत झाले असून रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यासाठी विज उपलब्ध करणाऱ्या महावितरणच्या आढमुठया धोरणामुळे शेतकरी आणखीनच हतबल झाला आहे. रात्रपाळीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असुन दिवसा वीज ऊपलब्ध न झाल्यास येत्या महीनाभरात महावितरणच्या आढमुठया धोरणाविरोधात शेतकरी संघटना मोर्चा काढणार असल्याचे माऊली ढोमे यांनी सांगितले आहे.

रात्रीच्या वेळेस बिबटयाच्या भितीने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच दररोज कोणत्या ना कोणत्या गावात शेतकऱ्यांचे पशुधन बिबटया फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

10 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

11 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

11 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

11 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

11 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

11 तास ago