कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर प्रश्न
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईला सामोरे गेलेल्या महिला तलाठीवर पुन्हा एकदा लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार एकाच अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने विभागातील पारदर्शकता, अंतर्गत देखरेख आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एसीबीच्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे आणि एका कोतवालाविरुद्ध दोन कोटी रुपयांच्या दंडाची भीती दाखवून १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून महसूल विभागात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, आश्विनी कोकाटे या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत असतानाही त्यांच्याविरोधात एसीबीने लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी कारवाई केली होती. त्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली असून, पूर्वीपासून गुन्हा दाखल असलेल्या अधिकाऱ्यांची संवेदनशील पदांवर नियुक्ती कशी झाली, त्यांच्यावर विभागीय स्तरावर कोणती देखरेख ठेवली जाते, अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट संबंधित विभाग आहे. अशा विभागात वारंवार लाचखोरीची प्रकरणे उघडकीस येत असतील, तर शासनाने कठोर विभागीय कारवाई, नियमित चौकशी आणि पारदर्शक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या…
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या…
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली…
वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही…