कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे एका व्यक्तीवर दोन भावांनी मिळून तलवार व दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असुन या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अभिजीत नंदू बत्ते (वय २९) रा. राजमुद्रा हॉटेल पाठीमागे, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन आकाश संजय बत्ते तसेच विकास संजय बत्ते (दोघेही रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दि. ४ जुन २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अभिजीत बत्ते यांच्या कपाळावर तलवारीने वार करुन पाठीत दगडाने मारले. फिर्यादीच्या घरासमोरच हि घटना घडली.
ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याचा राग मनात धरुन आरोपी आकाश बत्ते याने लोखंडी तलवारीने कपाळावर वार केला, तर विकास बत्ते याने दगडाने पाठीत मारून दुखापत करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप अभिजित बत्ते यांनी केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुलाब येळे हे करत आहेत.
शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल
रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
शिरुरमध्ये अज्ञात पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; गुन्हा दाखल
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…