रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर-वाघाळे-मलठण या प्रमुख दळणवळणाचा मार्ग असलेल्या रस्तावर प्रचंड मोठया प्रमाणात खड्डे पडले असुन रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ता आहे. हे समजणे कठीण झाले आहे. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असुन या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.
या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचा वापर शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी अशा सर्वच घटकांकडून मोठ्या प्रमाणावर होतो.
शिक्रापुर वरुन मलठणकडे जाताना गणेगाव येथील घाट, कामिनी नदीवरील अर्धवट पूल, वाघाळे येथील बढे वस्ती परिसरात खड्ड्यांची संख्या अधिक असून त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर प्रवास करणे अधिकच धोकादायक ठरत असून अनेकवेळा या ठिकाणी छोटे मोठया अपघातात नागरिक जखमी होत आहेत. तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
या मार्गावर असलेल्या सर्वच गावच्या ग्रामस्थांकडून सातत्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या मागणीला वाघाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनवणे, माजी उपसरपंच दिलीपराव थोरात, वाघाळे वि का सो चे अध्यक्ष विजय शेळके यांचाही पाठिंबा मिळत आहे.
शिक्रापुर-वाघाळे-मलठण हा रस्ता मंजुर झालेला असुनही अद्यापही काम सुरु न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा जनआंदोलन अटळ आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा वाघाळे ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही अशोकराव सोनवणे यांनी दिला आहे.
रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…