मुख्य बातम्या

चर्चांना उधाण! वर्षा उसगांवकर यांना लग्नाच्या 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही…

मुंबईः बिग बॉस मराठीचे 5वे सीजन गाजत असून, बिग बॉसच्या घरात मोठा वाद बघायला मिळाला.एका टास्कमध्ये निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार? असे थेट म्हटले. निकी तांबोळी हिचे हे विधान ऐकून विविध चर्चांना उधाण आले आहे. रितेश देशमुख याने निकी तांबोळी कान उघाडणी केल्यानतंर तिने वर्षा उसगांवकर यांची माफी मागितली.

वर्षा उसगांवकर यांचा विवाह 2000 मध्ये अजय शर्मा यांच्यासोबत झाला. वर्षा उसगांवकर यांचा विवाह कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या बहिणीच्या घरी पार पडला. वर्षा उसगांवकर आणि अजय शर्मा यांच्या लग्नाला आता तब्बल 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण, त्यांना अपत्य नाही. निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार? म्हटल्यावर त्यांनी थेट म्हटले की, मुले होऊ देणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू, यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

अजय शर्मा यांच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर वर्षा उसगांवकर या अभिनेता नितिश भारव्दाजच्या प्रेमात पडल्या होत्या. हेच नाही तर सेटवर यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यावेळी अशी चर्चा होती की, वर्षा उसगांवकर आणि नितिश भारव्दाज हे लग्न देखील करतील. मात्र, काही वर्षांनी यांचे रस्ते वेगळे झाले.

दरम्यान, वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फक्त मराठीच चित्रपट नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही धमाका केलाय. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या, त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

1 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

1 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

2 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

2 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

2 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

3 तास ago