शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याविषयीची तक्रार रांजणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यासाठी शेतकरी ऋषिकेश मलगुंडे हे गेले असता पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी हा विषय बाहेरच्या बाहेर कंपनीबरोबर बसून मिटवून टाका.असे म्हणत तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली असून तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप ऋषिकेश मलगुंडे यांनी केला असुन तेथील मंडल अधिकारी यांना फोनवरून माहीती दिली असता तहसिलदारांनी पत्र दिल्यावर पाहणी करण्यास जातो. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत प्रांत आधिकारी संतोषकुमार देशमुख यांना फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. या अवैध मुरुम ऊपसा प्रकरणी कंपनी प्रशासनाला कायम पाठीशी घालण्याचे काम पोलिस व तहसिल प्रशासण करत असून या बडया कंपनीवर कधी कारवाई होते कां…? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबाबत नायब तहसिलदार स्नेहागिरीगोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अर्जदाराने सोबत जोडलेल्या प्रस्तुत अर्जाचे अवलोकन करून सदर अर्जात नमुद उपस्थित मुद्याबाबत सविस्तर सखोल चौकशी करणेत यावी. व आपले स्तरावरुन प्रस्तुत प्रकरणी योग्य ती कार्यवाही करणेत यावी. व केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदारास आपले स्तरावरून कळविणेत यावे व या कार्यालयासही अवगत करावे. असा लेखी पत्र मंडल आधिकारी व रांजणगाव पोलिसांना तात्काळ दिले आहे. तसेच रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांना संपर्क साधला असता कंपनी प्रशासन आणि संबंधित शेतकरी दोघेही माझ्याकडे आले होते. परंतु त्यांनी वाद आपापसात मिटवून घेणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…
मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…