शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याविषयीची तक्रार रांजणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यासाठी शेतकरी ऋषिकेश मलगुंडे हे गेले असता पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी हा विषय बाहेरच्या बाहेर कंपनीबरोबर बसून मिटवून टाका.असे म्हणत तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली असून तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप ऋषिकेश मलगुंडे यांनी केला असुन तेथील मंडल अधिकारी यांना फोनवरून माहीती दिली असता तहसिलदारांनी पत्र दिल्यावर पाहणी करण्यास जातो. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत प्रांत आधिकारी संतोषकुमार देशमुख यांना फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. या अवैध मुरुम ऊपसा प्रकरणी कंपनी प्रशासनाला कायम पाठीशी घालण्याचे काम पोलिस व तहसिल प्रशासण करत असून या बडया कंपनीवर कधी कारवाई होते कां…? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबाबत नायब तहसिलदार स्नेहागिरीगोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अर्जदाराने सोबत जोडलेल्या प्रस्तुत अर्जाचे अवलोकन करून सदर अर्जात नमुद उपस्थित मुद्याबाबत सविस्तर सखोल चौकशी करणेत यावी. व आपले स्तरावरुन प्रस्तुत प्रकरणी योग्य ती कार्यवाही करणेत यावी. व केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदारास आपले स्तरावरून कळविणेत यावे व या कार्यालयासही अवगत करावे. असा लेखी पत्र मंडल आधिकारी व रांजणगाव पोलिसांना तात्काळ दिले आहे. तसेच रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांना संपर्क साधला असता कंपनी प्रशासन आणि संबंधित शेतकरी दोघेही माझ्याकडे आले होते. परंतु त्यांनी वाद आपापसात मिटवून घेणार असल्याचे सांगितले आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…