मुख्य बातम्या

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता काम केल्याने अधिकाऱ्यांवर माफी मागण्याची नामुष्की

सरदवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश; अनिल जाधव यांचे प्रतिज्ञापत्र चुकीचे ठरले

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ रामदास सरोदे व इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व एमआयडीसी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता तसेच जमिनीचे अधिग्रहण न करता रस्त्याचे काम सुरू केल्याप्रकरणी दाखल रिट पिटीशन क्रमांक 12927/2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर चा अधिकारी अनिल जाधव यांनी न्यायालयात चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे उघडकीस आले असून अखेर त्यांच्यावर माननीय उच्च न्यायालयाची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. सदरचा अधिकारी हा बेजबाबदार व निगरगठ्ठ असून चुकीचे कामे करण्यात पटाईत आहे असे नागरिक सांगत आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी असा सूर शिरूर तालुक्यात उमटत आहे.

सरदवाडी येथील शेतजमीन व खासगी मालकीच्या जागेतून पीडब्ल्यूडी व एमआयडीसी यांनी कोणतीही अधिकृत अधिसूचना न काढता, जमिनीचे अधिग्रहण न करता थेट रस्त्याचे काम सुरू केले होते. यामुळे संबंधित जमीनधारक व ग्रामस्थ संतप्त झाले होते. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर ग्रामस्थ रामदास सरोदे व इतरांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत उच्च न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर चा अधिकारी अनिल जाधव यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना वास्तविक परिस्थितीशी विसंगत माहिती दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेतली. त्यानंतर जाधव यांनी माननीय न्यायालयासमोर आपली चूक मान्य करत बिनशर्थ माफी मागितली.

न्यायालयात सरकारी अधिकाऱ्याकडून चुकीची माहिती देणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून त्यामुळे न्यायालयाची दिशाभूल होऊ शकते, अशी स्पष्ट टिप्पणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने भविष्यात कोणतेही काम सुरू करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या निकालामुळे सरदवाडीतील ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून “प्रशासन कितीही मोठे असले तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

15 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

20 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

20 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

20 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

20 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

20 तास ago