मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले आहे.

कोंढापूरी येथील तलाठ्याने जाणीवपुर्वक अनाधिकृत उत्खनन व गुंठेवारी करणाऱ्या प्लॉटिंग वाल्यांना साथ देत चुकीचा पंचनामा सादर केला आहे. शासनाची दिशाभुल करणाऱ्या कोंढापुरी येथील तलाठी यांची दप्तर तपासणी करून गट नं. १२९ / २ चा फेरपंचनामा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कोंढापूरी येथील गट नं. १२९/२ मध्ये कित्येक दिवसांपासून अवैधरित्या व्यवसायिक वापरासाठी मुरूम उत्खनन केलेले असुन मुळ मालक प्रविण ज्ञानोबा दरवडे व गणपत दौलत नरवडे यांनी सदर गटामध्ये प्रत्येकी १० आर.चे क्षेत्र हे प्लॉटिंग करून विकलेले आहे. त्या खरेदीदारांची नोंद ७ / १२ सदरी झालेली आहे. त्यामुळे या जमीनीचे चार मालक झालेले आहेत.

सदरच्या मुरूम विक्रीचा हिस्सा हा दस्ताच्या नकाशानुसार अभिषेक गायकवाड यांच्या नावे गेल्याचा सत्कृत पुराव्यानिशी दिसत आहे. तसेच सदरच्या जागेची विक्री ही १६ फुट रस्ता देवुन प्लॉटिंगसाठी केलेली दिसत आहे. याचा पुरावा सोबत जोडत आहे. सदरचा गट हा शेतीसाठी नसल्याचे पुरावे सोबत अर्जदाराने जोडलाआहे.

यापूर्वीदेखील या जमीनीच्या मालकांनी शासनाची फसवुणक केलेली आहे. पुर्वी एकदा सदर गटाच्या उत्खननाबाबतही झालेल्या केस संदर्भात सदरचे मा. तहसिलदार सो. यांच्याकडील क्र. क. गौ ख / उल्ख अना. दंड / एसआर / १२ / २०२० दि. ०३/ ०३ / २०२१ अन्वये अनाधिकृत मुरूम गौणखनिज उत्खनन दंड, रक्कम रूपये २१,६०,१०५/- बोजा गट नं. १२९ / २ वर दाखल फेरफार क्र. ४३८८ ने ७/१२ उताऱ्यावर दाखल करण्यात आला. त्यानंतर सदरच्या प्रकरणाबाबत मा. उपविभागीय अधिकारी पुणे यांचा आदेश क्रमांक : आरटीएस / अ / १११ / २०२२ दि. १५/०७/२०२२ अन्वये मा. तहसिलदार यांनी पारित केलेला आदेश रद्द केला व फेरफार क्र. ४६५३ ने ७/१२ उताऱ्यावरील बोजा रद्दबादल केला.

सदरच्या गटामध्ये राजरोस पणे अजुनही अवैधरित्या व्यवसायिक वापरासाठी मुरूम उत्खनन चालु आहे. त्याबाबत शेळके यांनी तहसिलदार शिरूर यांना (दि ३१) जुलै रोजी पत्र दिले होते. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने तहसिलदार शिरूर यांनी सदर जमीन मालकांना सुनावणी नोटीस काढली आहे. परंतू सदरच्या गटातील पंचनामा तलाठी कोंढापूरी यांनी चुकीचा केलेला असुन त्यांच्या पंचनाम्यात बेकायदेशीर प्लॉटिंगचा तसेच सदरच्या गटामध्ये गुंठ्याचे प्लॉट पाडल्याचा कुठलाही उल्लेख दिसुन येत नाही. प्रत्यक्ष दर्शनी त्या गटाचे फोटो सोबत जोडले आहे. तसेच सदरचा प्लॉट सपाट करण्यासाठी मुरूम उकरल्याचे तलाठी यांनी पंचनाम्यात नमुद केलेले आहे. परंतू प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच दिसुन येत असुन जमीन मालकांनी सदर गटातील मुरूम व्यवसायिक कामासाठी विकला आहे हे प्रत्यक्षदर्शनी दिसुन येत असुनही मौजे कोंढापुरी येथील तलाठी यांनी (दि. ०२) जुलै रोजी सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यान हा पंचनामा केल्याचे कागदपत्रांमधुन दिसुन येत आहे. परंतू केवळ जमीन मालकांना वाचविण्याचा तलाठ्याने प्रयत्न केल्याचा आरोप बाळासाहेब शेळके यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

20 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

22 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago