शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत तसेच फाऊंटन (कारंजा) दुरुस्तीबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर नगरपरिषदेला दिले आले.
शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राशेजारील फाऊंटन (कारंजा) ची फार बिकट अवस्था झालेली आहे. कारंजाच्या पिलरला अनेक ठिकाणी तड़े गेलेले आहेत. काही पिलर तर अक्षरश: सडलेले आहेत. फाउंटनच्या परिसरामध्ये दलदल निर्माण झाल्याने फाऊंटन कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होऊ शकतो.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ जलशुद्धीकरण केंद्र इमारत व फाउंटनची दुरुस्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे पत्र नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद यांना मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अनिल बांडे, मनसेचे मा.शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे महिला आघाडीचे डॉ. वैशाली साखरे आदी उपस्थित होते.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…