शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत तसेच फाऊंटन (कारंजा) दुरुस्तीबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर नगरपरिषदेला दिले आले.
शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राशेजारील फाऊंटन (कारंजा) ची फार बिकट अवस्था झालेली आहे. कारंजाच्या पिलरला अनेक ठिकाणी तड़े गेलेले आहेत. काही पिलर तर अक्षरश: सडलेले आहेत. फाउंटनच्या परिसरामध्ये दलदल निर्माण झाल्याने फाऊंटन कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होऊ शकतो.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ जलशुद्धीकरण केंद्र इमारत व फाउंटनची दुरुस्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे पत्र नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद यांना मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अनिल बांडे, मनसेचे मा.शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे महिला आघाडीचे डॉ. वैशाली साखरे आदी उपस्थित होते.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…