मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच रुग्णवाहिका यांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडून खडी वर आल्याने खडीवरून दूचाकी वाहन घसरून अपघात होत आहे. तसेच फोर व्हीलर गाड्यांचे टायर या ठिकाणी फुटत आहे. अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक नितीन थोरात यांनी सांगितले की, “एकदा नाही तर दोनदा खड्डे भरले, पण निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे रस्ता उखडला. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे काना डोळा करत आहे.” त्यामुळे ही दुरुस्ती केवळ कागदावरच झाली की काय, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून, शिरूर येथे कामावर असणाऱ्या परंतु पुणे येथे राहणाऱ्या आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

13 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

13 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

13 तास ago