मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच रुग्णवाहिका यांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडून खडी वर आल्याने खडीवरून दूचाकी वाहन घसरून अपघात होत आहे. तसेच फोर व्हीलर गाड्यांचे टायर या ठिकाणी फुटत आहे. अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक नितीन थोरात यांनी सांगितले की, “एकदा नाही तर दोनदा खड्डे भरले, पण निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे रस्ता उखडला. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे काना डोळा करत आहे.” त्यामुळे ही दुरुस्ती केवळ कागदावरच झाली की काय, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून, शिरूर येथे कामावर असणाऱ्या परंतु पुणे येथे राहणाऱ्या आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

6 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

11 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

12 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

12 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

12 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago