शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मानाचा चौथा समजला जाणारा श्री विठ्ठल मंदिर गणपती उत्सव यंदा खास ठरला आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल व त्यांचे सुपुत्र आदित्य धारिवाल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक पार पडली. या प्रसंगी धारिवाल कुटुंबाकडून पाच किलो वजनाचा भव्य चांदीचा मुकुट गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला.
दानशूर वृत्ती, समाजाभिमुख कार्य व देवभक्ती यासाठी ओळखले जाणारे धारिवाल कुटुंब गेली तीन पिढ्यांपासून शिरूरकरांच्या हृदयात घर करून आहे. या पिढीजात नात्याची प्रचिती आज शिरूरकरांना पुन्हा अनुभवायला मिळाली.
कुंभार आळी येथून गणपतीची सुरेख मूर्ती पारंपरिक शास्त्रीय वाद्यांच्या गजरात नगरातील प्रमुख रस्त्यांवरुन मिरवणुकीत आणण्यात आली. आदित्य धारिवाल यांनी मुकुटाचे वहन करून मिरवणुकीत अग्रभागी स्थान मिळवले, तर प्रकाशशेठ धारिवाल व शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह मान्यवर पायी चालत सहभागी झाले.
या भव्य मिरवणुकीस शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुंभार आळीत मिरवणुकीचे स्वागत मोठ्या आतषबाजीने करण्यात आले. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या क्षणी वातावरणात “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष दुमदुमला.
या प्रसंगी प्रकाशशेठ धारिवाल म्हणाले,गणपती उत्सव हा शिरूरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आमच्या कुटुंबाचीही गणरायावर अपार श्रद्धा असून ही परंपरा आम्हाला जपायची आहे.”तर आदित्य धारिवाल यांनी प्राणप्रतिष्ठेच्या आनंदाविषयी बोलताना व्यक्त केले, “गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मान लाभल्याने आम्हाला मनस्वी आनंद व प्रसन्नता लाभली आहे.”
या प्रसंगी नगरसेवक मुज्जफर कुरेशी, हाफिज बागवान, एजाज बागवान, किरण पठारे, बाळासाहेब जामदार, विजय शिर्के, संतोष शिंदे, दत्तात्रय काळे, संतोष जामदार, संभाजी जामदार, पोपट जामदार, बाबुराव जामदार, राजकुमार जामदार, वसीम शहा, नितीन जामदार, अमित शिर्के, विशाल भावटणकर, श्रीतोष अभंग, मयूर जामदार, शरद जामदार, सनी थोरात, चेतन जामदार, विक्रम जामदार, नितीन शिर्के, रोहन जामदार, नरेंद्र कडूस्कर, पप्पू शिर्के, कुणाल क्षीरसागर, प्रशांत आतकर, चरण जामदार, निलेश कुंभार यांच्यासह कुंभार आळीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अक्षय शिर्के यांनी केले. प्रास्ताविक योगेश जामदार यांनी तर आभार प्रदर्शन शंकर जामदार यांनी केले.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…