शिरूर तालुका

शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा जल्लोष

 

सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सलग दुसरा विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे): “बोल बजरंगबली की जय!” या जयघोषात शिरूर शहर दुमदुमले, कारण यंदाही शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा थरार रंगला. यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन व स्वराज्य रक्षक फाउंडेशन शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अद्वितीय महिला दहीहंडी उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषाताई कटके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण, दीपप्रज्वलन आणि नारळ फोडून करण्यात आली. यावेळी मनीषाताई कटके म्हणाल्या, “महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध करण्याची ही खरी संधी आहे. पुढील काळात अधिकाधिक शाळांनी व संघांनी या दहीहंडीत सहभागी होऊन शिरूर तालुक्याचे नाव मोठे करावे.’ या भव्य उत्सवात सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेज शिरूर, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव,सिताबाई चिटे बी फार्मसी कॉलेज शिरूर, आयटीकेबी कराटे क्लास आदी पाच संघांनी सहभाग घेतला.

पारंपरिक जल्लोषात सुरुवात झालेल्या या दहीहंडीला प्रत्येक संघाने मानवंदना दिली. अखेर, गेल्या वर्षीप्रमाणेचसीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनीनी थरारक पद्धतीने दहीहंडी फोडली आणि सलग दुसऱ्या वर्षी विजय मिळवत तब्बल २१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. विजयी संघासह सर्व सहभागी संघांचा मानाच्या ट्रॉफीने गौरव करण्यात आला. या सोहळ्याला आमदारपत्नी मनीषा कटके, माजी नगरसेविका हिराबाई ढोबळे, प्राजक्ता ढोबळे, शोभना पाचंगे, मनीषा कालेवर, स्नेहलता यादव, आयोजक संपादक शोभा परदेशी, यशस्विनी वेल्फेअरच्या सचिव नम्रता गवारी आदींसह सामाजिक, राजकीय व विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.या दही हंडी कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे असे मत यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या नम्रता गवारे यांनी मांडले.

या कार्यक्रमाच्या आरोग्य सुरक्षेसाठी शिरूर येथील स्त्री हॉस्पिटलने अॅम्बुलन्स, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून दिला होता. तसेच माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. दहीहंडीच्या पंच म्हणून अॅड, काजल धोरात व अमृत झांबरे यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे उत्कट सूत्रसंचालन संतोष झंजाड व किरण झांबरे यांनी केले. शिरूरमध्ये महिलांसाठी, महिलांनीच आयोजित केलेल्या या दहीहंडीचा उत्सव हा महाराष्ट्रातील एक आगळावेगळा उपक्रम ठरत असून, यातून “महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत हा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

6 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

7 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

7 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

7 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

7 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

7 तास ago