मुख्य बातम्या

शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, ३ नवीन जागांची वाढ

नागरिकांना हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची उलटी गणती सुरू झाली असून, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. या रचनेवर १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती/सूचना लेखी स्वरूपात आवक-जावक विभागामध्ये सादर कराव्यात. हरकती नोंदवणाऱ्या नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, मात्र ३१ ऑगस्टनंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत २१ नगरसेवक निवडले गेले होते. यंदा ३ जागांची वाढ करण्यात आली असून, एकूण २४ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी १२ प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

प्रभाग रचना कायम झाल्यानंतर याच प्रभागांवर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच महिलांसाठीचे आरक्षण निश्चित केले जाईल.

निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक इच्छुकांनी नगरपरिषदेच्या परिसरात चळवळ सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर नगर परिषदेतील संभाव्य प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहितीपत्रक नागरिकांच्या अवलोकनासाठी लावण्यात आले आहे. नागरिकांनी या रचनेचा अभ्यास करून, काही त्रुटी अथवा दोष असल्यास ३१ ऑगस्टपूर्वी लेखी हरकती व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

13 मिनिटे ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

18 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

33 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

40 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

42 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago