महाराष्ट्र

प्रोफेसर बनून 3 Idiots मध्ये ठसा उमटवणारे अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

मुंबई: काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्यातून कोणी सावरलं नव्हतं तोवर आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले आहे.

वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत पोतदार यांनी आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते आणि नंतर त्यांनी इंडियन ऑइल कंपनीत काम केले. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी 1980 मध्ये चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ आपले अभिनय कौशल्य दाखवले.

125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल

अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘अर्ध सत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘हम साथ साथ है’, भाई’, ‘दबंग 2’ आणि ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या सिनेमांमध्ये ते दिसले. आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ मध्ये त्यांनी प्राध्यापकाची भूमिका केली होती.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारुन अच्युत पोतदार यांनी घराघरात स्वतःचे नाव कमावले. या चित्रपटातील ‘क्या बात है’ आणि ‘कहना क्या चाहते हो?’ सारखे त्यांचे डायलॉग इतके सुपरहिट झाले की त्यांचे सतत मीम व्हायरल होत असतात.

अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही केलेले काम

चित्रपटांव्यतिरिक्त, अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली. त्यांनी ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, ‘मिसेस तेंडुलकर’ आणि ‘भारत की खोज’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयातून टीव्ही आणि सिनेमांमध्ये खूप नाव कमावले. अच्युत पोतदार यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान खूप मोठे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

16 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

16 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

16 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

16 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

21 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

21 तास ago