मुख्य बातम्या

भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना मोजणी नकाशा मिळवण्यासाठी मारावे लागतात वारंवार हेलपाटे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर भुमी अभिलेख कार्यालयात मोजणी होऊनही महीनोमहिने ‘क’ प्रत (मोजणी नकाशा) मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना वारंवार भुमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून संबंधित कर्मचारी हे नागरीकांना उडवाऊडवीची उत्तरे देत आहेत. तसेच संबंधित मोजणी झालेली प्रकरणे व मोजणीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे यांचा कोणत्याही प्रकारचा मेळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागत नसल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.

तसेच भुमी अभिलेख कार्यालयामध्ये मंजूर असणारे कर्मचारी यांची संख्या नगण्य असून रीक्त पदांची संख्या जास्त आहे. कार्यालयामध्ये नियुक्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या मुळ नियुक्तीच्या पदावरून इतर पदावर काम करत असल्याचे अ‍ॅड सागर दरेकर यांनी सांगितले आहे. तसेच छानणी लिपिक पदावर काम करणारे कर्मचारी यांना कार्यालयीन कामाचा मेळ लागत नसून त्यांच्या ताब्यात असणारे मोजणी पुर्व प्रकरणे व मोजणी झालेली प्रकरणे यांची कोणत्याच प्रकारे नोंद नोंदवहीतआढळून येत नसल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

गेल्या ६ महीन्यापासून दरेकर यांचे मोजणी झालेले प्रकरण छानणी लिपिक व अभिलेख पाल यांच्या कडे मिळून येत नाही. त्यामुळे त्यांनी या कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून दरेकर यांनी जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली असुन सदर प्रकरण येत्या आठ दिवसात न मिळाल्यास भुमि अभिलेख कार्यालयात आत्मदहन करण्याच्या इशारा दिला आहे. शिरुर तालुक्यात असे अनेक शेतकरी वारंवार ‘क’ प्रत मिळवण्यासाठी हेलपाटे मारत असून वरिष्ठ आधिकाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच मोजणीच्या दिवशी भुकरमापक येत नसल्याच्या तक्रारीही मोठया प्रमाणावर येत आहे. भुमी अभिलेख कार्यालयामध्ये अनेक झिरो साहेबांचा प्रचंड वावर असून सरकारी कागदपत्रे त्यांच्या शिवाय हालत नसल्याचे दिसुन येत आहे. तात्काळ त्यांना हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रलंबित प्रकरणांची माहिती घेण्याचे काम हाती घेतले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोजणी नकाशे उपलब्ध करुन दिली जातील.

गणेश कराड, 

नवनिर्वाचित, प्रभारी उपअधिक्षक

भुमी अभिलेख

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

18 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

18 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

18 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

20 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago