रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असुन रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे म्हणजे जीव मुठीत धरुन जाण्यासारखे झाले आहे. एका बाजूला बिबट्याचा धोका तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा सुळसुळाट या दुहेरी संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
एकीकडे बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळतात. तर दुसरीकडे याचाच फायदा घेत चोरटे बोरवेल व विहिरींतील वीजेच्या मोटर केबल्स कापून चोरी करतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या घटनांविरोधात शेतकऱ्यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असल्या तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्या व चोरट्यांच्या धोक्यापासून संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई
आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण
पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी
मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…
पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…