मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील बापलेकाचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिरूर दि.०५ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत बापलेकाचा विहीरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा समावेश आहे. सुदाम गाढवे हे सकाळी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ लोटला तरी ते परत न आल्याने मुलगा भारत त्यांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला. त्याने वडिलांना पाण्यात पडलेले पाहून त्यांना वाचविण्यासाठी मित्राला हाक देत विहिरीत उडी घेतली, मात्र त्यालाही विजेचा जबर धक्का बसला. पाण्यात विजेचा करंट उतरल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला.

भारतच्या मित्राने बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. ग्रामस्थांनी वीजप्रवाह बंद करून बापलेकाला विहिरीतून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायातील भक्तीमय कार्यात अग्रेसर होते. ते टाकळीकर प्रासादिक दिंडीसोबत दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत असत. भजनी मालिकेचे त्यांना विशेष ज्ञान होते. मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी येथे अकरावीचा विद्यार्थी होता.

गाढवे कुटुंब नगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून टाकळी हाजी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांनी दूध व्यवसाय उभारला होता. सध्या त्यांच्या कुटुंबाकडे दहा ते पंधरा जर्सी गाई असून दररोज शंभर लिटर दूध डेअरीला पुरविले जात होते. बापलेकाच्या अकाली निधनाने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

4 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

5 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

5 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

5 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

7 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

8 तास ago