शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक वर्षाहुन अधिक काळ विविध संकलनाची कामे रखडली होती. त्या अनुषंगाने राजकिय व्यक्तींनी पाठ फिरवली होती. त्यांचे कुठलेही नियंत्रण या कार्यालयावर नव्हते. त्यातच अॅड. आमदार अशोक पवार यांचे शिरूरपेक्षा वाघोलीकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांच्यावर होत होती.
शिरूरला प्रभारी तहसिल असल्याने व नागरीकांची कामे होत नसल्याने ते ३० जानेवारी रोजी उपोषण करणार होते. परंतू प्रभारी तहसिलदारांची बदली झाल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवण्याचे काम “शिरूर तालुका डॉट कॉम” ने केले आहे.
शिरूरला पुन्हा नव्याने प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी हे शिरूरला रुजू झाले असून ते प्रलंबित प्रकरणांची माहीती घेऊन प्रकरणे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करत आहे.
शनिवारी (दि. ४) रोजी आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जनता दरबार भरवणार असून यामध्ये भूमी अभिलेख, महावितरण, महसूल,पोलीस स्टेशन, पंचायत समिती आदी विभागाच्या समस्या निवारण करण्यासाठी तहसील कार्यालय, शिरूर येथे शनिवारी (दि. 4) रोजीसकाळी ११ ते दुपारी ३ वाजता नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. जनता दरबारामध्ये खरच नागरीकांची किती कामे मार्गी लागतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…