क्राईम

कासारीतून सेंट्रींग कामाच्या प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील बंगल्याच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणहून सेंट्रींग कामाच्या प्लेटा चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांच्या प्लॉटिंगमध्ये इस्माईल खान यांच्या बंगल्याचे काम सुरु असून सदर काम रामानंद चौहान हे ठेकेदार करत आहेत, सध्या बंगल्याचे काम सुरु असल्याने चौहान यांनी सदर ठिकाणी सेंट्रींग कामाच्या प्लेटा ठेवलेल्या आहेत. २९ जानेवारी रोजी दिवसभर कामगार काम करुन घेरी गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा आले असतान त्यांना सदर ठिकाणी ठेवलेल्या सेंट्रींग कामाच्या तब्बल 20 प्लेटा व काही साहित्य मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला सर्वत्र पाहणी केली असता कोठेही प्लेटा व इतर साहित्य मिळून आले नाही.

त्यामुळे सदर ठिकाणच्या प्लेटा व आदी साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने रामानंद जगती चौहान (वय ५१) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मिसरवली ता. घोशी जि. मऊ राज्य उत्तरप्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

41 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago