शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राजकारणात अनेकांची धांदल उडविणारे पैलवान मंगलदास बांदल यांना नुकताच जामीन मिळाल्याने ते आज पत्रकार परिषदेत नक्की काय बोलणार याकडे सर्व शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु आपण सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसुन सध्यातरी “एकला चलो रे” हिच भुमिका असल्याचे बांदल यांनी सांगितले. तसेच ज्यांनी मला जेल मध्ये पाठवलं त्यांना वाटतं असेल की मी घाबरुन जाईल, पण मी लाल मातीतला पैलवान आहे. त्यामुळे विरोधकांना चितपट करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुमारे बावीस महिन्यांच्या करावासानंतर पैलवान मंगलदास बांदल यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला. त्यानंतर काही दिवसांनी ते करागृहाबाहेर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. आज शिरुर येथील पत्रकार परिषदेत बांदल नक्की काय भुमिका मांडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. परंतु बांदल यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर सडकून टिका केली. बांदल म्हणाले राजकारणात मला कोणताही राजकीय वारसा नाही. मी बाप्पुसाहेब थिटे यांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आहे. तुम्हाला वार करायचा ना समोरुन करा ना पाठीवर कुठं वार करता. राजकारण करताना समोरासमोर विरोध करा.
आज शिरुर तालुका एका वेगळ्या दिशेला चालला असुन बापुसाहेब थिटे यांच्या नंतर या तालुक्याला कधीही मंत्रीपद मिळालं नाही. आम्हाला संघर्ष नवीन नाही. माझ्यावर 2007, 2008, 2009 मध्ये दाखल झालेले आर्थिक गुन्हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना बाहेर काढले आणि मला जेलमध्ये पाठवलं मग तोपर्यंत सरकार काय झोपल होत का असा सवाल बांदल यांनी केला. त्यांना 2021 मध्ये असा काय साक्षात्कार झाला की मंगलदास बांदल गुन्हेगार आहे. माझ्याकडे लायसन्स असलेलं वेपण पोलिस स्टेशनला जमा असतानाही घाणेरडं राजकारण करुन मला अडकवलं असा आरोप बांदल यांनी केला. यावेळी युवा नेते निखील बांदल, ॲड आदित्य सासवडे, निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे, बाबू पाटील ढमढेरे, मयूर ओस्तवाल, निलेश खरबस,अनिकेत गायकवाड, दिपक मगर यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…