मुख्य बातम्या

रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे कचऱ्याचे साम्राज्य

शिरुर:- शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे आसपासचे रहिवासी मोठया प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साठले असुन रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असुन ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतची हद्द मोठी असून काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या दोन ते तीन दिवसांनी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रामलिंगच्या बाजूला राहणारे रहिवासी घरातील सर्व ओला-सुका कचरा रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा या ठिकाणी टाकत असून त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठत आहे. तसेच हे ढिग साठल्याने रात्रीच्या वेळेस या ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो कचरा पेटवुन दिला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या धुराचा त्रास होत आहे.

याबाबत शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पोपट केदारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतची घंटागाडी ठराविक वेळेत उभी करणार आहोत. तसेच लोकांनी रस्त्यावर किंवा इतरत्र कुठे कचरा टाकू नये त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही फ्लेक्स लावून जनजागृतीही करत आहोत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

6 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

6 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

6 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

6 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

8 तास ago