शिरुर:- शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे आसपासचे रहिवासी मोठया प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साठले असुन रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असुन ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतची हद्द मोठी असून काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या दोन ते तीन दिवसांनी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रामलिंगच्या बाजूला राहणारे रहिवासी घरातील सर्व ओला-सुका कचरा रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा या ठिकाणी टाकत असून त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठत आहे. तसेच हे ढिग साठल्याने रात्रीच्या वेळेस या ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो कचरा पेटवुन दिला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या धुराचा त्रास होत आहे.
याबाबत शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पोपट केदारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतची घंटागाडी ठराविक वेळेत उभी करणार आहोत. तसेच लोकांनी रस्त्यावर किंवा इतरत्र कुठे कचरा टाकू नये त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही फ्लेक्स लावून जनजागृतीही करत आहोत.
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…