शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. एका महिलेच्या गळयातील १,२०,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून, यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर टु व्हिलरवर आलेल्या दोन चोरटयांनी उज्वला प्रवीण पाटील (वय 35 वर्ष ) या महिलेच्या गळयातील १,२०,००० रु. किमतीचे सोन्याचे दोन तोळ्याचे मिनी गंठण, सोन्याच्या पट्टीचे मनी मंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरून नेले आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, मंगळवारी (ता. २५) सकाळी ०७ : ३०वा.चे सुमारास शिरूर गावच्या रामलिंग हद्दीत ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर उज्वला पाटील या किराणा दुकानातून साहित्य घेऊन परत घराकडे पायी जात होत्या. यावेळी समोरून स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम .एच. २२ ए .क्यू ९०७० वरून दोन अनोळखी आले. अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील होते. एकाच्या अंगात काळा रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट व दुसऱ्याच्या अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातलेली, गळ्याला काळा रुमाल बांधलेला यांनी समोरून येऊन मोटार सायकल स्लो करून मोटरसायकल वरील मागे बसलेल्या एकाने उज्वला पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण किंमत अंदाजे रू १, २०, ००० रुपये किमतीचे दागिने हाताने धरून जोराने हिसकावून ओढून जबरीने चोरून घेऊन पळून गेले आहेत.
किराणा दुकानदाराने ही बाब पाहताच चोरट्यांना अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंरतु, चोरटे गाडी सोडून पळून शेजारील उसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत दोन चोरट्यांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद उज्वला पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…