शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. एका महिलेच्या गळयातील १,२०,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून, यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर टु व्हिलरवर आलेल्या दोन चोरटयांनी उज्वला प्रवीण पाटील (वय 35 वर्ष ) या महिलेच्या गळयातील १,२०,००० रु. किमतीचे सोन्याचे दोन तोळ्याचे मिनी गंठण, सोन्याच्या पट्टीचे मनी मंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरून नेले आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, मंगळवारी (ता. २५) सकाळी ०७ : ३०वा.चे सुमारास शिरूर गावच्या रामलिंग हद्दीत ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर उज्वला पाटील या किराणा दुकानातून साहित्य घेऊन परत घराकडे पायी जात होत्या. यावेळी समोरून स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम .एच. २२ ए .क्यू ९०७० वरून दोन अनोळखी आले. अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील होते. एकाच्या अंगात काळा रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट व दुसऱ्याच्या अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातलेली, गळ्याला काळा रुमाल बांधलेला यांनी समोरून येऊन मोटार सायकल स्लो करून मोटरसायकल वरील मागे बसलेल्या एकाने उज्वला पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण किंमत अंदाजे रू १, २०, ००० रुपये किमतीचे दागिने हाताने धरून जोराने हिसकावून ओढून जबरीने चोरून घेऊन पळून गेले आहेत.
किराणा दुकानदाराने ही बाब पाहताच चोरट्यांना अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंरतु, चोरटे गाडी सोडून पळून शेजारील उसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत दोन चोरट्यांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद उज्वला पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…