मुख्य बातम्या

सरकारी दप्तर थेट गावात! शिरूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’चा धडाका

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली.

बैठकीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भूषविले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती व नगर परिषद अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील तसेच विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंडलनिहाय शिबिरांचे वेळापत्रक

मार्च २०२६ :

७ मार्च – पाबळ

१४ मार्च – वडगाव रासाई

२७ मार्च – निमोणे

एप्रिल २०२६ :

१० एप्रिल – तळेगाव ढमढेरे

१७ एप्रिल – मलठण

२४ एप्रिल – टाकळीहाजी

मे २०२६ :

८ मे – न्हावरा

१५ मे – टाकळीहाजी

२० मे – कोरेगाव भिमा

२८ मे – शिरूर

या शिबिरांमध्ये महसूल, कृषी व इतर विभागांच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार व वारस नोंदी निकाली काढणे, जिवंत 7/12 मोहिम, उत्पन्न-रहिवासी-जात दाखले, सामाजिक योजनांसाठी अर्ज, नमुना ६, ७, ८ स्वीकारणे, जमीन भोगवटा वर्ग रूपांतरण, 7/12 दुरुस्ती, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी, पीएम किसान नोंदणी, तक्रार निवारण तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

या अभियानाद्वारे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे व महसूल विषयक प्रश्न त्वरित निकाली काढणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शिरूर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मंडलातील निश्चित तारखेला आयोजित शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनमहसुल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्रातील ३५ हजार कंपन्या बंद; उद्योगांवरील सरकारचे दावे फोल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती झाल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा…

9 मिनिटे ago

खरगेंच्या सभास्थळाचे हवन करून शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे घेतलेल्या…

12 मिनिटे ago

बीडच्या क्रीडा संकुलात सुनेत्रा पवारांची अचानक भेट; खेळाडूंशी साधला संवाद

बीड: बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी…

14 मिनिटे ago

‘रांजणगावमधील तुझे दिवस संपले’ MIDC मध्ये HR मॅनेजरला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एका कंपनीच्या एचआर मॅनेजरला…

19 मिनिटे ago

रामदास आठवले सामाजिक न्यायाची मशाल; एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ…

9 तास ago

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गंभीर आजारांमुळे २७३ बळी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.…

9 तास ago