शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घोडनदी काठावरील १०० एच.पी. क्षमतेचे विद्युतरोहित्र निकामी करून २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घटनास्थळी १० ते १२ जणांच्या टोळीने ही चोरी केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून, सिंचन व्यवस्थेवरही त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.
या प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, अन्यथा पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन टाकळी हाजी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य मराठी पत्रकार महासंघ नियोजन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बोंबे यांनी दिला आहे.
बोंबे यांनी सांगितले की, यापूर्वीही या भागात कृषीपंप, केबल चोरी, दरोडे, खून तसेच इतर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
पिंपरखेड परिसर हा बिबटप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, मागील दोन-तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच रात्रीचे भारनियमन आणि अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशा वेळी केबल चोरीमुळे त्यांचे आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.
बेट भागात अवैध दारूविक्री, मटका, जुगार यांसारखे अवैध व्यवसायही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करत या प्रकारांवर पोलीस प्रशासनाने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणीही बोंबे यांनी केली आहे.
विद्युतरोहित्र व केबल चोरीप्रकरणी तातडीने गुन्हेगारांना जेरबंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…
मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…