मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असुन मुलींच्या पालकांना यामुळे मोठी डोकेदुःखी वाढली आहे. शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली पळुन जाण्याचे प्रमाण सध्या शिरुर तालुक्यात वाढले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.

 

शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनला अल्पवयीन मुली पळुन जात असल्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असुन अनेकवेळा सहा महिने ते एक वर्षे या मुलींचा ठावठिकाना पोलिसांना सुद्धा सापडत नाही. त्यामुळे पोलिसांना तपासातही अनेक अडचणी येत आहेत. तसेच अनेकवेळा पळुन जाऊन मुलगी लग्न करते. त्यानंतर तिला एखादं अपत्य होत. मग पालकही तक्रार मागे घेतात.

 

गावातील राजकीय पुढारी जबाबदार…?

एखाद्या गावातुन जर एखादी अल्पवयीन मुलगी पळुन गेली तर गावातीलच काही राजकीय पुढारी ज्याने अल्पवयीन मुलगी पळुन नेली त्याला मदत करतात. त्या जोडप्याची लांब कुठंतरी दुसरीकडे राहायची सोय करतात. त्यानंतर काही दिवसांनी त्या जोडप्याला एखादं अपत्य झाल्यानंतर गावात परत आणतात. त्यामुळे मुलीच्या पालकांचाही नाईलाज होतो. त्यामुळे या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी कडक भुमिका घेणे गरजेचे आहे.

 

शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या जेवढ्या तक्रारी आहेत. त्या सर्व तक्रारींच्या बाबतीत पोलिस हे संवेदनशील आहेत. अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला शिक्षा देण्याचीच आमची भुमिका आहे. परंतु याबाबत मुलीच्या पालकांनीही पोलिसांकडे येऊन तक्रार करण गरजेचं आहे.

प्रशांत ढोले

उपविभागीय अधिकारी (शिरुर)

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिरुर शहरात गांजाचे सेवन करताना पाच जण सापडले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

20 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago