मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असुन मुलींच्या पालकांना यामुळे मोठी डोकेदुःखी वाढली आहे. शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली पळुन जाण्याचे प्रमाण सध्या शिरुर तालुक्यात वाढले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.

 

शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनला अल्पवयीन मुली पळुन जात असल्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असुन अनेकवेळा सहा महिने ते एक वर्षे या मुलींचा ठावठिकाना पोलिसांना सुद्धा सापडत नाही. त्यामुळे पोलिसांना तपासातही अनेक अडचणी येत आहेत. तसेच अनेकवेळा पळुन जाऊन मुलगी लग्न करते. त्यानंतर तिला एखादं अपत्य होत. मग पालकही तक्रार मागे घेतात.

 

गावातील राजकीय पुढारी जबाबदार…?

एखाद्या गावातुन जर एखादी अल्पवयीन मुलगी पळुन गेली तर गावातीलच काही राजकीय पुढारी ज्याने अल्पवयीन मुलगी पळुन नेली त्याला मदत करतात. त्या जोडप्याची लांब कुठंतरी दुसरीकडे राहायची सोय करतात. त्यानंतर काही दिवसांनी त्या जोडप्याला एखादं अपत्य झाल्यानंतर गावात परत आणतात. त्यामुळे मुलीच्या पालकांचाही नाईलाज होतो. त्यामुळे या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी कडक भुमिका घेणे गरजेचे आहे.

 

शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या जेवढ्या तक्रारी आहेत. त्या सर्व तक्रारींच्या बाबतीत पोलिस हे संवेदनशील आहेत. अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला शिक्षा देण्याचीच आमची भुमिका आहे. परंतु याबाबत मुलीच्या पालकांनीही पोलिसांकडे येऊन तक्रार करण गरजेचं आहे.

प्रशांत ढोले

उपविभागीय अधिकारी (शिरुर)

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिरुर शहरात गांजाचे सेवन करताना पाच जण सापडले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

15 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

15 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

15 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

15 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

20 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

20 तास ago