मुख्य बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मुंबई : राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तक्ता प्रसिद्ध केला असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचे विभाजन स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषद आणि ३३४ पंचायत समित्यांमधील जागांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीनंतर जिल्हाधिकारी प्राथमिक आरक्षण जाहीर करतील. त्यावर हरकती व सूचना घेण्यात येतील. त्यानंतर विभागीय आयुक्त अंतिम अहवाल शासनाकडे सादर करतील. ३ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणाचा तिढा सुटणार आहे.

दरम्यान, आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीकृत पद्धतीने चिठ्ठ्या टाकून जागांचे वाटप करण्यात आले. यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरक्षण निश्चित झाले असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गणिते बदलणार असून अनेक ठिकाणी तिकीट वाटपात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत याबाबतची राजकीय घडामोडी वेगाने घडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल.

राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची नवी खेळी

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणूक एकत्र

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

5 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

14 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

14 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

15 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

20 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

20 तास ago