मुख्य बातम्या

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

शिरुर (तेजस फडके) राज्य महामार्ग क्रमांक १०३ वरील आमदाबाद ते मलठण रस्त्यावरील व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ट कामांबाबत निषेध व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सुरु केलेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला आज रविवार (दि ८) रोजी आठ दिवस पूर्ण झाले. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ वाळूंज व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरुर तहसिल कार्यालयाच्या आवारात आज (दि ८) रोजी सामुहिक मुंडण करत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच आमरण उपोषणाची घोषणा केली.

या सामुहिक मुंडण आंदोलनात निलेश वाळूंज, सागर रासकर, दादाभाऊ कुरुंदळे, कल्पना पुंडे, मान्यता वाळूंज यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी सुनिता वाखारे, सोनाली दसगुडे, भाऊसाहेब लाळगे, गौतम कुदळे, शेखर कुरुंदळे, बबलू कुरुंदळे, प्रताप दसगुडे, ज्ञानदेव माऊली कुरुंदळे, सोमनाथ देव्हाडे, अर्णव कुरुंदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य महामार्ग क्रमांक १०३ वरील आमदाबाद ते मलठण रस्त्यावरील व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ट कामांबाबत रस्ता कामातील अनियमिततेच्या निषेधार्थ वाळूंज यांचे आंदोलन सुरु असुन शासनाचा तीव्र शब्दात निषेध करत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज म्हणाले, “या आंदोलना संदर्भात राष्ट्रपती कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, शासन व अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली तरीही कोणत्याच कार्यालयाकडुन या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही.” त्यामुळे उद्या सोमवार (दि ९) जूनपासून आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.

निलेश वाळूंज यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे 

१) राज्य महामार्ग १०३ वरील रस्त्याचे निकृष्ट काम त्वरित बंद करून दर्जेदार पद्धतीने नव्याने सुरू करावे.

२) दक्षता गुणनियंत्रण मंडळामार्फत सखोल तांत्रिक तपासणी करुन चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करावा.

३) रामलिंग ते अन्नापुर रस्त्यावर झालेल्या पुर्वीच्या निकृष्ट कामाचा तपास अहवालही जनतेपुढे सादर करावा.

४) संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर शासन निर्णय २०१७ नुसार गुन्हे दाखल करावेत.

५) आंदोलनाच्या आदल्या दिवशी अचानक सुरू करण्यात आलेल्या कामाचीही चौकशी करावी.

सदर आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असुन निलेश वाळुंज यांनी जाहीर केलेल्या आमरण उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांवर त्वरित कारवाई करुन नागरिकांच्या सुरक्षेचा आणि अधिकारांचा विचार करावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

26 मिनिटे ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

31 मिनिटे ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

36 मिनिटे ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

46 मिनिटे ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

48 मिनिटे ago

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…

51 मिनिटे ago