मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी बनावट बिल तयार करत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रतीभा बोरकर आणि शहनाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विष्णु लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. सॉलीटीअर बिल्डींग, फ्लॅट क्र. २०४, बिजे कॉर्नर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ०४ जून २०१८ ते १५ जुलै २०२१ दरम्यान कुरुळी ग्रामपंचायत हद्दीतील चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी न्यू साईराज ट्रेडर्स या फर्मचे बनावट बिल (चलन क्र. ३७५०) तयार करण्यात आले. या बिलाच्या आधारे सरपंच प्रतीभा प्रमोद बोरकर व शहनाज अरीफ पठाण यांनी रु. १ लाख ३१ हजार २०० एवढी रक्कम न्यू साईराज ट्रेडर्स यांना अदा केली. याशिवाय, या फर्मकडील जीएसटी बिल नं. ५३७ आणि ४६५ सुद्धा बनावट असून त्यावर जीएसटी भरलेले नाही.

तसेच कामावर लावलेल्या मजुरांच्या हजेरीवर खाडाखोड करून फक्त सुरज दशरथ भोईटे यांच्या नावावर रु. २४ हजारचा धनादेश दिला गेला. एकुण रु. १ लाख ५५ हजार २०० रुपयेचा बनावट खर्च दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला असुन या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात दि ६ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते हे पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago