ऊसतोडीसाठी आमदाबाद गावात टोळयाच दिल्या नाहीत
शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावातील ऊसतोडीसंदर्भात घोडगंगा साखर कारखाना, न्हावरे सुडाचे राजकारण करीत असून आमदाबाद गावातून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलच्या विरोधात दोन उमेदवार उभे केले होते. त्याचा राग मनात धरुन या गावातील उसतोडीसाठी टोळ्याच पाठवल्या जात नसल्याचे आमदाबाद येथील शेतकरी सांगत आहे. त्यामुळे आमदाबाद येथील शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून कारखान्याच्या मनमानी व चुकीच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
आमदाबाद येथील नागरीकांनी पॅनलच्या विरोधात उभे राहू नये म्हणुन आमदारांनी खुप प्रयत्न केले.परंतू केवळ विरोधात उभे राहील्याने सुडाची भावना मनात ठेवून ऊस तोड न केल्याने मोठा अन्याय येथील ऊसपिक घेतलेल्या सभासद शेतकऱ्यांवर होत आहे. रोग, अतिवृष्टीपासून जीवापाड जपलेला ऊस तुटत नसल्याने असंतोषाची भावना आमदाबाद येथील शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.
यापुर्वी गावामध्ये पाच – पाच टोळ्या ऊसतोडीसाठी येत होत्या. निवडणुकीत त्यांच्या विरोधात या गावातील उमेदवार आता जाणिवपुर्वक त्रास देवून शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेला जात नाही. येत्या चार दिवसात ऊसतोडीसाठी टोळ्या न दिल्यास सभासद शेतकरी घोडगंगा साखर कारखान्यापुढे आंदोलन ऊभारणार आहे.
अशोक माशेरे, आमदाबाद ग्रामस्थ
यावर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन ऋषिराज पवार यांनी सांगितले की, ऊस तोडण्याचा प्रोग्रॅम तारखेनुसार सुरु आहे. या हंगामात टोळया कमी आहे. केलेले आरोप हे बिनबुडाचे आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…