मुख्य बातम्या

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्या पत्नीच्या नावावर रांजणगाव गणपती येथे पाच एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. तर त्या जमिनीची कागदपत्र पाचुंदकर यांनी १६ ऑक्टोबर पर्यंत काढुन ठेवावी मी ती जमीन त्यांच्या नावावर करतो असे प्रति आव्हान निकम यांनी पाचुंदकर यांना दिले होते.

परंतु १६ ऑक्टोबर पर्यंत वाट पाहुनही मानसिंग पाचुंदकर यांनी जमिनीची कागदपत्र किंवा त्याबाबतचा पुरावा सादर न केल्याने देवदत्त निकम यांनी काल (दि १७) रोजी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी रांजणगाव येथे पत्रकार परिषद घेत पाचुंदकर यांच्यावर टिका करत त्यांचा खरपूस समाचार घेतला.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत मानसिंग पाचुंदकर हे देवदत्त निकम यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर निकम यांनी पत्रकार परिषद घेत सन २००८ साली पाचुंदकर यांचे नाव तडीपारीच्या यादीत असल्याबाबत चा पुरावा सादर करत पाचुंदकर हे गुंड असल्याची टिका केली होती. त्यानंतर मानसिंग पाचुंदकर यांनी एका सभेत हो सन २००८ साली माझे नाव तडीपारीच्या यादीत होते. पण दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यात आल्यानंतर ‘वाल्या’ चा ‘वाल्मिकी’ झाला असल्याचे विधान केले होते.

 

तसेच देवदत्त निकम यांच्या पत्नी राजश्री निकम यांच्या नावावर रांजणगाव गणपती येथे पाच एकर जमीन असल्याचा आरोप करत ती जमीन त्यांनी रांजणगाव देवस्थान किंवा ग्रामपंचायत यांना दान करावी असे विधान पाचुंदकर यांनी केले होते. त्यानंतर देवदत्त निकम यांनी त्याला प्रति आव्हान देत जर माझ्या किंवा पत्नीच्या नावावर पाच एकराचा सातबारा असेल तर पाचुंदकर यांनी शिरुर किंवा तळेगाव ढमढेरे येथील सब रजिस्टर कार्यालयात येऊन तो कागद आणावा मी स्वतःच्या खर्चाने ती जमीन खरेदीखत करुन मानसिंग पाचुंदकर यांच्या नावे करुन देतो असे निकम यांनी सांगितले होते.

 

परंतु १६ ऑक्टोबर उलटूनही मानसिंग पाचुंदकर यांनी देवदत्त निकम यांचे आव्हान स्वीकारले नाही किंवा त्याबाबत काही विधानही केले नाही. त्यामुळे काल (दि १७) रोजी निकम यांनी रांजणगाव गणपती मंदिरात येऊन प्रथम महागणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर एका हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेत पाचुंदकर यांच्यावर शेलक्या शब्दात टिका करत त्यांचा खरपूस समाचार घेतला.

 

यावेळी बोलताना निकम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ऊर्फ ‘वाल्या’ याने दिलेल्या आव्हानाचा स्विकार करुन मी आज रांजणगाव येथे आलो असुन मी दिलेले आव्हान त्यांनी स्वीकारले नाही. शिरुर-आंबेगावचे स्वयंघोषित वाल्मिकी जो वास्तविक ‘वाल्या’ च आहे. त्याच्या नावावर जातेगांव खुर्द गट क्रं ९१/१ मध्ये २ हेक्टर १० आर क्षेत्र असुन त्यांनी ती ज्या भावंडांच्या पाठीवर पाय देऊन तुम्ही राजकारणात आलाय त्यांना स्वखुशीने द्यावी किंवा जमीन भावंडांना द्यायची नसेल तर रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट आणि रांजणगाव ग्रामपंचायतला अर्धी अर्धी दान करावी असा टोला लागवला.

दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

43 मिनिटे ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

2 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

2 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

3 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

3 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

7 तास ago