मुख्य बातम्या

कांद्याने केला गरीब बळीराजाचा वांदा, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोडमडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे) कांद्याला यंदा चांगला भाव मिळेल… त्या येणाऱ्या पैशामधून बॅकेचे कर्ज फेडु…मुलांचे शिक्षण, लग्न करू… हे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नाचे इमले केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बेचिराख झाले ..अशी खंत शिरूर तालुक्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ, शेतकरी वैभव शेलार, सागर दंडवते या शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केली आहे.

शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामातील कांद्यासाठी हवामान पोषक असल्यामुळे साडेचार महिन्यात कांद्याचे उत्पादन चांगले येते एकेकाळी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरुर तालुक्यात चासकमान, मीना शाखा ,डिंभा ,घोड या चार कालव्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आली असून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

कांदयांच्या उत्पादनासाठी कांदा बी , नांगरट , मशागत, रासायनिक खते ,विज बिल तसेच मजुरीचे दर लावगडीसाठी ३५० ते ४०० रुपये झाल्याने उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. मार्च महीन्यात काढलेला कांदा बाजार भाव २० रुपयांच्या आत असेल तर शेतकरी साठवून ठेवतात . यावर्षी मार्च पासुनचं चांगला भाव नसल्यांने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवलेला आहे.

अनेक वेळा खराब हवामान, उन्हाळ्यात कांदा जास्त तापला किंवा पाऊस जास्त झाला. तरी संपुर्ण कांदा चाळीत सडुन जातो. गेल्या वर्षी वर्षभर योग्य भाववाढ न झाल्याने कांदा मोठ्या प्रमाणात सडला,अनेक शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना फसविले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यावर्षी योग्य भाव मिळेल अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मागील पंधरा दिवसापुर्वी अनेक बाजार समित्यामधे ३० रुपये पर्यंत बाजारभाव गेले. त्यामुळे शेतकरी वर्गात चैतन्य निर्माण झाले होते.

कांद्याचे पैसे झाल्यानंतर मुला मुलींच्या शिक्षणाची फी,लग्न, दवाखान्याची उधारी, कर्जाचे हप्ते, खते औषधाचे उधारी सर्व काही मिटवून टाकू अशी अनेक स्वप्न पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली आहे .

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

4 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

4 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

4 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

7 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

7 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

7 तास ago