शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक ठरलेल्या पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. साखर कारखान्याचा सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मंगलदिनी होत आहे. यानिमित्ताने कारखान्याचा ९ वा “बॉयलर अग्नीप्रदिपन व गव्हाणपूजन समारंभ” गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
साखर हंगामाचा प्रारंभ हा नेहमीच उत्साहाचा क्षण असतो. शेतकरी बांधवांनी वर्षभर मेहनतीने पिकवलेल्या ऊसाला कारखान्यात गोडीची सुरुवात मिळते. या निमित्ताने कारखान्याच्या प्रांगणात गव्हाणपूजन करून पारंपरिक पद्धतीने बॉयलर अग्नीप्रदिपन करून गळीत हंगामाची औपचारिक सुरुवात होईल.
कारखान्याच्या परिसरात विशेष सजावट करण्यात आली असून शेतकरी व उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक स्वागत केले जाणार आहे.
पराग अॅग्रो साखर कारखाना गेल्या आठ हंगामांपासून शेतकरी बांधवांच्या सहकार्याने आणि मेहनतीने यशस्वीपणे कार्यरत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे, परस्पर विश्वास व परस्पर सहकार्य या तीन गोष्टींवर कारखान्याने नेहमीच भर दिला आहे. साखरेसोबतच पॉवर प्रकल्प व डिस्टिलरी विभागामुळे कारखाना शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे.
मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या…
मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज…
मुंबई: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व…
कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी…
बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला…