शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक ठरलेल्या पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. साखर कारखान्याचा सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मंगलदिनी होत आहे. यानिमित्ताने कारखान्याचा ९ वा “बॉयलर अग्नीप्रदिपन व गव्हाणपूजन समारंभ” गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
साखर हंगामाचा प्रारंभ हा नेहमीच उत्साहाचा क्षण असतो. शेतकरी बांधवांनी वर्षभर मेहनतीने पिकवलेल्या ऊसाला कारखान्यात गोडीची सुरुवात मिळते. या निमित्ताने कारखान्याच्या प्रांगणात गव्हाणपूजन करून पारंपरिक पद्धतीने बॉयलर अग्नीप्रदिपन करून गळीत हंगामाची औपचारिक सुरुवात होईल.
कारखान्याच्या परिसरात विशेष सजावट करण्यात आली असून शेतकरी व उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक स्वागत केले जाणार आहे.
पराग अॅग्रो साखर कारखाना गेल्या आठ हंगामांपासून शेतकरी बांधवांच्या सहकार्याने आणि मेहनतीने यशस्वीपणे कार्यरत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे, परस्पर विश्वास व परस्पर सहकार्य या तीन गोष्टींवर कारखान्याने नेहमीच भर दिला आहे. साखरेसोबतच पॉवर प्रकल्प व डिस्टिलरी विभागामुळे कारखाना शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे.
मुंबई: संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) स्थापनेच्या मागणीला पुन्हा गती मिळाली आहे. यासाठी आमदार…
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization…
मुंबई: विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी 'विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)…
मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर…
शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा…
यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष…