मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथे किसान जागृती यात्रेची १६ फेब्रुवारीला जाहीर सभेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत देशभर सुरु असलेली किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल होणार असुन या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व जनआंदोलनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असुन यातील मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

1) एमएसपीला कायदेशीर हमी

संपूर्ण शेतकरी कर्जमाफी

उसाचा एफआरपी दर 6000 रुपये प्रतिटन करणे.

2) जमीन संपादन कायदा २०१३ पुन्हा लागू करणे.

3) पीक विमा योजनेत आमूलाग्र सुधारणा

4) ही किसान जागृती यात्रा संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय संयोजक व ज्येष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल (पंजाब) हे करत आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी कन्याकुमारी येथून प्रारंभ झालेली ही यात्रा १९ मार्च २०२६ रोजी काश्मीर येथे समारोप होणार आहे.

ऐतिहासिक आंदोलनांचा अनुभव…

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी यापुर्वी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीन कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सलग १३ महिने चाललेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तसेच २०१८ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदान येथे अण्णा हजारे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यानंतरही राज्य व केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करुन घेण्यासाठी त्यांनी सलग १३१ दिवस उपोषण करून संघर्षाची परंपरा कायम ठेवली आहे.

रांजणगावात जाहीर सभेचे आयोजन

यात्रेच्या स्वागतानंतर रांजणगाव गणपती येथील मोरया लॉन्स, मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जगजीत सिंग डल्लेवाल शेतकरी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी प्रादेशिक शेतकरी संघटना, ग्राहक संघटना, भ्रष्टाचारविरोधी संघटना, माहिती अधिकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी ऐक्याचा संदेश देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजूट निर्माण करण्यासाठी व शेतकरी हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली आहे.

रांजणगाव गणपती येथे होणारे स्वागत व जाहीर सभा हे शेतकरी चळवळीला नवे बळ देणारे ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.रांजणगाव परिसरातील शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक यात्रेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

27 मिनिटे ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

29 मिनिटे ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

36 मिनिटे ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

39 मिनिटे ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

42 मिनिटे ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

10 तास ago