महाराष्ट्र

मंत्रालयात लाचखोरी प्रकरण: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर येत असेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.”

सपकाळ यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारच्या काळात सचिवालयाचे नाव बदलून ‘मंत्रालय’ ठेवण्यात आले होते, जेणेकरून लोकांना सरकार आपले वाटावे. मात्र, सध्याच्या महायुती सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘भ्रष्टाचारालय’ झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.

लाच घेताना पकडलेल्या लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच रक्कम स्वीकारल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मंत्री झिरवळ यांनी “या प्रकरणात संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका जाहीर केली आहे. मात्र, निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने कायम ठेवली आहे.या प्रकरणामुळे भाजपा महायुती सरकार अडचणीत आले असून पुढील काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

4 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

4 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

4 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

4 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

4 तास ago

शरीर कमजोर झालंय? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाड

शेवगा (Moringa) ही एक कॉमन भाजी आहे. भारतभरातील लोक आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. खासकरून साऊथ…

5 तास ago