पुणे: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि पाणीटंचाईसारख्या समस्यांचा अखेर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने विचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत.
मूळ नियोजनानुसार पुणे-शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला ५६ किमी लांबीचा दुमजली उड्डाणपूल वाघोली येथून सुरू होणार होता. मात्र अजित पवार यांच्या आदेशानुसार हा पूल आता विमाननगरमधील फिनिक्स मॉलपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विमाननगर, खराडी, वडगाव शेरी या वाहतूकदृष्ट्या अति बोझ पडलेल्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. फिनिक्स मॉलपासून सुरू झाल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच वेळेचीही बचत होणार आहे.
शिवाय, पुणे-नगर रस्त्यावरील सोमनाथनगर चौक ते खराडी बायपास चौक दरम्यान धोकादायक बीआरटी मार्गिका अपघातांना कारणीभूत ठरत होती. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या मागणीवरून अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना ही मार्गिका तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
वडगाव शेरी, गणेशनगर, खराडी, विमाननगरसारख्या भागांतील पाणीटंचाई हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न होता. यावर अजित पवार यांनी स्पष्ट सूचना देत महापालिकेच्या टँकर सेवेला अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना पुरवले जाणारे टँकर हे विनाशुल्क असतील, हे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी टँकरवाल्यांच्या मनमानी दरांवर आळा बसेल.
येरवडा येथील म्हाडा पुनर्विकास प्रकल्प रखडलेला असून त्याच्या परवानग्यांवर काम लांबले होते. या प्रकल्पास गती देण्यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना संबंधित परवानग्या त्वरीत मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रहिवाशांना नवीन घरांचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…
पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…
पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…
पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…
रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…