शिरुर (तेजस फडके): शिरुर परीसरात काल गुरुवार (दि. 8) रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. सोने सांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा, करंजावणे, गणेगाव परिसरात पावसाबरोबरचं वाऱ्यांचा जोर खुप होता.
याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले की विजेचे खांब पडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शिरुर तालुक्यात सूरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विजेचे खांब मोडुन तसेच ट्रान्सफॉर्मर जळुन संपुर्ण विज पुरवठा खंडीत व विस्कळीत झाला असून महावितरणचे नुकसान झाल्याची माहिती सहायक अभियंता दीपक पाचुंदकर यांनी दिली.
MIDC रांजणगाव मध्ये सुद्धा लाईन वर झाडे पडली असून विजपुरवठा विस्कळीत झाला आहे, असे रामेश्वर ढाकणे यांनी माहिती दिली. तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकुळ घातला असून विजेचा कडकडाट ही मोठया प्रमाणात वाढला होता. दुपारी चार वाजल्यापासुन वादळी वाऱ्याला सुरवात झाली होती. त्याचबरोबर विजेचा कडकडाट वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांत घबराट पसरली आहे.
शिरुर तालुक्यातील रांजणगाव, कारेगाव, कोंढापुरी, ढोकसागवी सोनेसांगवी या परिसरातील उच्चदाब वाहिनीचे 25 व लघुदाब वाहिनीचे 40 सिमेंट चे खांब मोडले आहेत. तर विज पडुन ट्रान्सफॉर्मर जळाले असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांकडे खांबांची मागणी केली आहे. मात्र ते येईपर्यंत पडलेल्या खांबा पैकीच जे खांब चांगले आहेत यांची तपासणी करुन ते उभा करुन विद्युत पुरवठा सुरु करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठी गँग व जनमीत्र कार्यरत आहेत. जो भाग विद्युत पुरवठ्यापासुन पुर्ण वंचित आहे. त्या भागातील विद्युत पुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. खंडीत व विस्कळीत विजपुरवठ्या मुळे अनेक गावात रात्री उशीरा पर्यत अंधार होता. नागरीकांनी विज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु असुन नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी केले आहे.
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…
घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…
आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…
अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…