शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव MIDC पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. त्यावेळी फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करत ट्रव्हल्सला सोडून देऊन मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. राजंणगाव MIDC परीसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन तरुण पिढी व्यसनाधिन होऊन वाममार्गाला लागली आहे.
रांजणगाव पोलिसांचे अनेक नवनवीन कारनामे रोज समोर येत असुन या ट्रव्हल्समध्ये गांजा आला कुठून याचा शोध घेऊन गांजाची होणारी तस्करी मुळासकट शोधून काढून खरे आरोपी पकडण्याचे आव्हान रांजणगाव पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.. या प्रकरणाची वेगवेगळ्या चर्चा रंगत असून या पाठीमागचे नेमके गुढ कधी उलगडणार याकडे या परीसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.याबाबत रांजणगाव MIDC चे पोलिस हवालदार विलास आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीला नोंद घेतली असून पंचनामे केले आहे. गाडीमध्ये पॅसेजर असल्यामुळे गाडी जप्त केली नाही. फुटेजवरून आरोपीला शोधण्यास टिम पुणे येथे गेली असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…
ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…
सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…