vishal-kale-shirur
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे याचा मृत्यू झाला आहे. केदार चंद्रकांत झाडगे आणि उमेश अनिल जगदाळे हे दोन युवक जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार चालू आहेत. जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सनी संजय यादव आणि विशाल पन्दी यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे हा केदार झाडगे आणि उमेश जगदाळे यांच्यासोबत काही कामानिमित्त बाहेर गेला होता. गाडी नंबर एमएम 12 एक्सक्यु 5704 या कारमधून तिघंही आपलं काम करून निघाले होते. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. जोराचा पाऊस सुरू असताना त्यानंतर समोरून आलेल्या एमएच 14 एलए 1128 या कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर सगळे कारमधून उतरले आणि काळे यांच्या साथिदारांवर बेछुट गोळीबार सुरू झाला.
आपल्यावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच काळे आणि त्याचा मित्र जगदाळे याने पळ काढला. समोर दिसणाऱ्या ढाब्याच्या दिशेने दोघंही पळत सुटले. मागून आरोपी त्यांचा पाठलाग करत होते. हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. उमेश जगदाळे हा ढाब्याच्या आडोशाला लपून बसला आणि मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. विशाल काळे याला यावेळी गोळी लागली अन् तो रस्त्यावरच पडला. त्यावेळी मागून सनी यादव आणि त्याचा सहकारी दुचाकीवरून त्याचा पाठलाग करत होते. दोघांनी विशाल काळे याला धरलं अन् त्याच्या डोक्यात दगड घातला.
दरम्यान, विशाल काळे याला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी आलेल्या दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….
शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…
Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…
शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…
…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…