मुख्य बातम्या

“शिरुर तालुका डॉट कॉम” च्या बातमीचा दणका…पाटबंधारे विभागाकडून तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे येथे मीना कालव्याच्या कॅनॉलचे पाणी रविवार(दि 23) तुंबले गेल्याने “मीना कालवा फुटून शेतात पाणी, शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान” झाल्याची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध करताच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर जी हांडे, शाखाधिकारी एस टी दाते, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष रोहिदास मुसळे आणि मीना कालवा टाकळी हाजी कार्यालयाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली आहे.

रविवार (दि 23) रोजी मिना कालव्याचा कॅनॉल फुटून शेतात पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे, पंचनामा करण्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक आज सोमवार (दि 24) रोजी उपलब्ध नसल्यामुळे मंगळवारी (दि.२५) रोजी पंचनामा केला जाईल असे टाकळी हाजी कार्यालयाचे शाखाधिकारी एस. टी. दाते यांनी सांगितले आहे. आम्हाला कांद्याची नुकसान भरपाई मिळावी तसेच कॅनॉलची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील बाधित शेतकरी निळू चोरे यांनी केली आहे.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

14 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

14 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

14 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

14 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

16 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

16 तास ago