anubhavanchya-paulkhuna

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या विविध कार्यांच्या माध्यमातून केलेल्या कामात आलेल्या अनुभवांतून लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे रविवारी (ता. ३०) प्रकाशन करण्यात आले. ईश्वरी प्रकाशन, पुणे यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता नितीन महाजन, जुन्नर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अन्वर सय्यद, रुक्साना सय्यद, दस्तगीर शेख, उद्योजक पै. गणेश लोखंडे, डॉ. हेमंत दातखिळे, लेखक संतोष धायबर, सचिन बेंडभर, मनोहर परदेशी, राहुल चातुर, संजीव मांढरे, विठ्ठल वळसे पाटील, संभाजी गोरडे, आकाश भोरडे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, जितेंद्रकुमार थिटे, नागनाथ शिंगाडे, प्रवीणकुमार जगताप, एन. बी. मुल्ला, प्रकाश चव्हाण, जालिंदर आदक, शंकर पाबळे, मंदार तकटे, सचिन धुमाळ, भगवान खुर्पे, मिलिंद देवरे, अनिल जगताप, लखन शिरसकर, अतुल थोरवे, राहुल गायकवाड, वैभव निकाळजे, विक्रम दुपारगुडे, रुपेश बोरुडे यांसह आदी उपस्थित होते.

आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवातून माणूस काहीतरी शिकून मोठा होत असतो आणि माणसाला आलेल्या अनुभवांचा इतर लोकांना फायदा होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केले. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असल्याचे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणकुमार जगताप व एन. बी. मुल्ला यांनी केले तर प्रास्ताविक लेखक शेरखान शेख यांनी केले आणि श्रीकांत भाडळे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत